![सदाशिव लोखंडे](https://thebusinesstimes.online/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-17-at-12.03.25.jpeg)
नेवासा – राज्यात भाजप-मिंधे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची युती असली तरी नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र बेबनाव असल्याचे दिसून येत आहे. शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.
शिर्डी मतदारसंघात सुमारे ८०० गावे असून, अतिवृष्टी झाल्यावर खासदार फिरकलेदेखील नाहीत. ते भाजपा तसेच शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात नाहीत. फक्त ठेकेदारांसमवेत त्यांची उठबस असते. त्यांच्या काळातील दहा वर्षांत मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे मतदारांत प्रचंड नाराजी आहे, असे पत्रात म्हटले आहे.
![](https://thebusinesstimes.online/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-02-at-6.51.26-PM-1024x1024.jpeg)